Saturday, January 26, 2008

प्रस्तावना


आज मी फार फार वर्षानी काही लिहियाला घेतले आहे अर्थात मी पुर्वी खुप काही लिहित होतो असे नाही. कधी कधी एखाद्या बालसहित्यीकांच्या पुस्तकात कींवा एखाद्या मासिकत कथा छापुन येई, फार नही तर शाळा, महाविद्यालायाच्या वार्षिक अंकात लेख छापून यायचा. आपले नाव कुठे तरी छापुन येतं याचाच आनंद त्यावेळेस जास्त होता कदाचित त्या लहान वयात माझ्या लिहिण्याचा उद्देश पण माज्या लिखाणासारखा बालिश देखील असेल पण पुढे आपोआप त्यात खंड पडत गेला. मग पुढे १० वी १२ वी मग उच्च्शीक्षण शिक्षण या सगळ्या गोंड्स नावाखाली तर ते पार नहिसे झाल्यासारखे झाले सोबतच अवांतर वाचन पण फ़क्त वर्त्तमान पत्रा पुरते मर्यादित झाले (पुढे तर २४ तास वृत्त वहिन्यानिं उरलेली कसर पूर्ण केली. मग पुढे जेंव्हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला तेंव्हा कधी कधी वाटायचे आता परत वाचन लिखाण करता येइल पण नाही पुढे मग वाटायचे मराठीत किती तरी लेखक अणि कवी आहेत, त्यात आपल्याने कोणती मोलाची भर पडणार ? (खरतर तो आळशीपणा होता) असे ३-४ वर्ष गेले, नंतर माझ्या लक्ष्यात आले आपण काहीतरी फार गमवातो आहे आणि ते म्हणजे आपली अभिव्यक्ति कि जी प्रत्येकाला असते फ़क्त ती व्यक्त होण्याचे प्रकार वेगळे असतात कोणाची ती संगीतातुन व्यक्त होते कोणाची एखाद्या क्रिडेतुंन अगदी कोणाची कामातुन आणि कोणाची तर विध्वंसक कृतितुनदेखिल. मग आपली अभिव्यक्ति कशातुन व्यक्त होत असेल प्रश्न मला पडला आणि लक्ष्यात आले कि ती व्यक्त होते आहे आपल्या सध्याच्या बोलण्यातुन बरेच दा मित्रांसोबत विनोद निर्मिति करण्याच्या प्रयत्नात असे शब्द , उपमा वापरले जातात जे दैनदिन व्यवहारत वापरले तर फार वेगळे वाटतात . हे सारे येतात कुठून? कदाचित खोलवर जे कुठे तरी माझं साहित्य प्रेम आहे त्यातून तर वर येत नसतील? मग आशा शब्दांना अणि पर्यायानी आपल्या भावनांना वाट करून देण्यास फक्त तेवढाच मार्ग नक्कीच नाही (आणि बरेचदा अशा प्रकारचा विनोद निर्मितिच्या प्रयत्नात विनोदापेक्षा आपलेच हसे जास्त होते)
अर्थात इथे या ब्लोग वर देखील मी किती अणि काय लिहू शकेल याची मला खात्री नाही पण एवढे मात्र नक्की जे काही मनात असेल ते यातून बाहेर पडेल, कधी त्यात भावनाचा कल्लोळ असेल तरी कधी असंबद्ध वाटतील असे विचार, ते कोणी वाचेल न वाचले कोणाला आवाडेल न आवडेल या बाबी सध्या तरी दुय्यम आहेत . माझ्या लेखी हा फक्त एक मनाचा दर्पण आहे . जसं आपण आरश्यात पाहून स्वतःला नीट नेटके ठेवण्याचा प्रयत्न करत असतो अगदी तसाच , बाह्य रूप आरशात पहाता येते ते पाहून त्यात हवे नको ते बदत करता येतात वेगवेगळे प्रयोग (फँशन म्हणुन ) करता येतात मग ज्या आपल्या संस्कृतित मनाच्या सुंदरतेला देखील तेव्हढेच किंबहुना थोडे जास्तच महत्व दिले आहे त्याचा आरसा मिळतो कुठे? कसा आपण आपले मन ओळखायचे अणि त्याला सुन्दर बनवाचे ह्या सर्वाची उत्तर कुठे मिळत नाही जे काही मिळतात ते सुद्धा आपल्याला लागु पडतीलच असे नाही शेवटी आप्ल्यालाच आपला शोध घ्यावा लागतो एवढे नक्की मी देखील त्याच शोधत आहे जे काही असेल ते इथे लिहुन व्यक्त करेल, व्यक्त झालेले न्याहळेले, वाटले तर त्यात बदल करेल शेवटी मनातले कुठे तरी व्यक्त झाल्यावरच कळनार ना ते काय म्हणते आहे, सध्या तरी माला हा सरळ सोपा आणि साधा मार्ग आहे असे वाटते बघुया तो कुठे घेऊन जातो ते...आणि हो तुम्हाला तो आवडला नाही आवडला तरी प्रतिक्रिया नक्की द्या बर का, कारण आरश्यात आपण कितीसुद्धा पाहुन सजवले तरी बाहेरून कोणी त्याला प्रतिक्रिया दिल्याशिवाया त्याचे चीज़ झाल्यासारखे वाटत नाही ना......